Saturday, 23 May 2020

स्वराज्य रक्षक संभाजी

पुरंदरच्या किल्ल्यावर जन्म झाला नव्या इतिहासाचा,
आनंदाला पारावर उरला नाही स्वराज्यातील जनतेला!
महाराष्ट्राच्या मातीला आशीर्वाद लाभला आई- भवानीचा,
पुत्र हा सह्याद्रीचा , छावा शोभला शिवछत्रपतींचा!!

स्वराज्याचा भगवाही नव्या उमेदीने फडकू लागला,
येथील मातीलाही कस्तुरीचा सुगंध येऊ लागला!
पशु-पक्षी ,राने-वनेही आनंदाने डोलू लागली,
नद्या-नाले, सप्तसगरही शंभु शंभु म्हणू लागली!!

वयाच्या दुसऱ्या वर्षीच शंभुबाळाचं मातृछत्र हरवलं,
बालपणीच पोर आईच्या मायेला पोरकं झालं!
त्यानंतर आऊसाहेब आणि आबासाहेबांनीच सर्व सांभाळलं,
स्वराज्याच्या या छाव्यास धगधगत्या लाव्हाचं रूप दिलं!!

वयाच्या नवव्या वर्षीच या छव्यानं दिलेरखानास नमवलं,
मुघलांच्या आसमंताध्येही स्वराज्यप्रेम जागवलं!
दिल्लीत जाऊन आलमगीर औरंग्याची सुद्धा झोप उडविली,
अबसाहेबांच्या सुटकेसाठी पराक्रमाची शर्थ गाजविली!!

माँ जिजाऊनंतर शंभुबाळ अग्निदिव्यास समोरं गेलं,
जिजाऊनंतर ते "श्रीमान" रायगडासही पोरकं झालं!
आप्तेष्टांच्या कट-कारस्थानांनाही ते कधीही नाही डगमगले,
तर, स्वतःच्या स्वराज्यनिष्ठने पुन्हा एकदा उजळून निघाले!!

स्वराज्याचे शिवरूपी छत्र जेंव्हा मावळले,
आपले दुःख बाजूला ठेऊन त्यांनी रयतेला अपलेसे केले!
एकाच वेळी पाच शत्रूंशी दोन हात केले,
अखंड महाराष्ट्रात एकटेच मर्द मराठे शोभले!!

सलग नऊ वर्षे या छाव्याने स्वराज्याची सीमा विस्तारली, 
शिवबाच्या आरमारास विज्ञानाची जोड दिली!
अखेरपर्यंत शिवविचारांना मनात जागते ठेवले,
सर्व रयतेच्या मनात सवाईशिवराय शोभले!!

असा हा छावा शत्रूंसाठी आयुष्यभर कर्दनकाळ ठरला,
आबासाहेब आणि स्वराज्यासाठी त्यांनी मृत्यूही कवटाळला!

शंभुराज्यांचे बलिदान पाहून भीमा-इंद्रायणीमाईही अश्रु  ढाळू  लागली,
अशा थोर स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांची कहाणी इतिहासात अजरामर झाली!!

लेखन -संग्रामजित दिगंबर वराडे

No comments:

Post a Comment

श्रीशिवराज्याभिषेक

रायगड सजले , भारतात समाज शासनबद्ध झाला आणि मराठ्यांच्या राज्यकारभारात नवे पर्व सुरू झाले- राजधानी रायरीवर शिवाजी महाराजांचा राज्...