Friday, 22 May 2020

शिवराज्य


छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्य स्थापन केले. उत्तरेत मोगल ,दक्षिणेत विजापूरची आदिलशाही, भागानगर चा कुतूबशाह ,पोर्तुगीज, सिद्धी,इंग्रज यांच्या विरोधात संघर्ष करून स्वराज्याची बांधणी मजबूत केली. 1645 ते 1680 हा महाराजांचा राजकीय कालखंड होय.हा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका सुंदर आहे. या ठिकाणी रयतेचे राज्य होते. येथील प्रत्येक माणसाला मीच छत्रपती आहे असे वाटून स्वराज्याच्या लढात्यात आपले रक्त त्यानी बलिदान केले. वयाच्या16 व्या वर्षी स्वराज्याचे  लावलेले झाड छत्रपतींनी त्यांची मूळे इतकी खोल रोवली केली.उत्तरेतून येणाऱ्या औरंगजेबाला ती उकरुन काढताआली नाहीत.1682ला छत्रपती च्या निधनानंतर स्वराज्य लगेच जिंकून घेता येईल या उदेशाने आलेल्या औरंगजेबास दक्षिणेत मराठयाशी 25 वषे प्रदीर्घ संघर्ष करावा लागला. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, मराठयांची भद्रकाली महाराणी ताराबाई यांच्या शी त्याने संघर्ष केला. छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष तरी अंगावर काटा आणारा आहे. महाराजांच्या निधनानंतर1681ते 89हा इतिहास मराठी सत्तेचा असमितेचा आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी मोगल, सिद्धी,इंग्रज,पोर्तुगीज यांच्या शी लढून स्वराज्य राखले. धर्मवीर राज्या म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना ओळखले जाते. मध्य युगीन भारताच्या इतिहासात धर्मासाठी आपले प्राण देणारा राजा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना ओळखले जाते.202 युद्धे लहान मोठेे त्यांनी जिंकले.छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर छ.शिवाजी महाराज आणि
 महाराणी सोयराबाई चे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज यांनी 1689 पासून ते1699पर्यंत स्वराज्य राखले.1689ला रायगड औरंगजेबाने जिंकल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे तामिळनाडू मधील जिंजी चा किल्ला जो किल्ला छ.शिवाजी महाराजांनी 1678 ला दक्षिण मोहिमेत जिंकून घेतला होता. तेथून1689 ते 1695 पर्यंत राजकारभार पाहिला.मराठयांची राजधानी जिंजी ही त्यांनी बनवली. मोगल सरदार झुलफिकारखान यांच्या विरोधात 10 वर्षे संघर्ष केला. त्यांनी वतनदारी व्यवस्था सुरू केली. 1695 ला छ.राजाराम महाराज स्वराज्यात परत आले.1695 ला सातारा ही राजधानी बनवून मराठी स्वातंत्र्य युध्दांचे नेतृत्व केले. त्याच्या निधनानंतर महाराणी ताराबाई यांनी 1699 ते 1707 पर्यंत औरंगजेबाच्या मूत्यू पर्यंत त्याला फक्त झुलवत ठेवले. ताराबाई नी नवीन युद्ध पध्दत सुरू केली. औरंगजेबाला किल्ला उन्हाळ्यात विंकत दयाचा आणि पावसाळ्यात तो पुन्हा जिंकून घ्यायचा.यातून स्वराज्याची अर्थव्यवस्था सावरली. राणीच्या पराक्रमाचे कौतुक समकालीन इतिहास कार खाफीखान याने तारीखे ई खाफीखान या ग्रंथात केले आहे.औरंगजेब सुध्दा कौतुक करतो.स्वराज्य वाढवण्यामध्ये शिलेदारांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. तानाजी, येसाजी, कंकाजी, कोंडाजी, बाजी, नेताजी, वीरशिवा, संताजी, धनाजी यासारखे शेकडो शिलेदारांनी पराक्रमाचे शौर्य गाजवले.
प्रा.विनोद जालिंदर निकम
(एम.ए.इतिहास, सेट,जीवनप्रबोधिनी कन्या
 महाविद्यालय ,विटा. जि. सांगली
मो.9146256525

(सदर लेखाचे अधिकार लेखकाचे राहतील हा लेख जास्त लोकांपर्यंत पोहचावा ह्या हेतूने स्वराज्य माझ्या राजांच वेबपोर्टल वर Post केला आहे त्यावर वेबपोर्टल चा अधिकार नाही. )
-----------------------------------------

स्वराज्य माझ्या राजांच Android App येथून 👉Download करा

शिवसह्याद्री  Android App येथून
👉Download करा

स्वराज्य माझ्या राजांच फेसबुक पेज येथून 👉 Like करा


No comments:

Post a Comment

श्रीशिवराज्याभिषेक

रायगड सजले , भारतात समाज शासनबद्ध झाला आणि मराठ्यांच्या राज्यकारभारात नवे पर्व सुरू झाले- राजधानी रायरीवर शिवाजी महाराजांचा राज्...